गेल्या काही महिन्यांपासून उत्तराखंड, हिमाचल, ईशान्येकडील राज्यांसह देशाच्या विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. चार दिवसांपूर्वी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. सुमारे 30 ते 40 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले आणि लोक घाबरून घराबाहेर पडले.

राजस्थानपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, राजस्थानच्या बिकानेरमध्ये ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचवेळी अरुणाचल प्रदेशातील चांगलांग येथेही भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 मोजली गेली. शनिवार आणि रविवारी मध्यरात्री 1.45 वाजता चांगलांग येथे भूकंपाचे धक्के जाणवले. 30 मिनिटांनी बिकानेरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दोन्ही ठिकाणी जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू बिकानेरपासून 516 किमी पश्चिमेला होता.
गेल्या काही महिन्यांपासून उत्तराखंड, हिमाचल, ईशान्येकडील राज्यांसह देशाच्या विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. चार दिवसांपूर्वी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.7 एवढी होती. हा भूकंप दुपारी ४.४२ वाजता झाला. त्याचे केंद्र नांगलोई होते. याच्या एक दिवस आधीही दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.8 होती आणि भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे होता. सुमारे 30 ते 40 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले आणि लोक घाबरून घराबाहेर पडले.
पंजाब सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, मुलतान, मुझफ्फरगड आणि फैसलाबाद शहरात गेल्या काही दिवसांत मोफत गव्हाचे पीठ मिळवण्याच्या प्रयत्नात चार वृद्धांचा मृत्यू झाला आणि अनेक बेशुद्ध पडले. ते म्हणाले की, लोकांची प्रचंड गर्दी आणि वितरण केंद्रांवर सुविधांचा अभाव यामुळे या घटना घडल्या आहेत. ते म्हणाले, चेंगराचेंगरीमुळे दोन जणांचा मृत्यू झाला तर तासनतास रांगेत उभे राहिल्यानंतर थकल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला.
आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानातील लोकांमध्ये हाहाकार आहे. पीठ घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गेल्या काही दिवसांत सरकारी वितरण केंद्रातून मोफत पीठ मिळवण्याच्या प्रयत्नात किमान चार वृद्धांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. गगनाला भिडणाऱ्या महागाईला तोंड देण्यासाठी खासकरून पंजाब प्रांतातील गरिबांसाठी मोफत पीठ योजना सुरू करण्यात आली. याचा फायदा घेण्यासाठी सरकारी वितरण केंद्रावर गर्दी जमली आणि अनेकांचा मृत्यू झाला.